Friday, 7 April 2017

टीम वर्क

*टीम (TEAM) म्हणजे नक्की काय ?*

▪एकदा एक श्रीमंत उद्योगपती एका खेडेगावात कारखान्यासाठी साईट बघायला गेला होता ...

▪रस्ता कच्चा, खडबडीत होता. काही ठिकाणी रस्त्यात पाणी पण साठले होते, खुप चिखल झाला होता. येताना त्या उद्योगपतीची गाडी चिखलात रुतली आणि बंद पडली ...

▪कोणाची मदत मिळते का हे बघायला तो गाडितून खाली उतरला. त्याला थोड्या अंतरावरू एक म्हातारे शेतकरीबाबा येताना दिसले. त्याने त्या शेतकरीबाबांना थांबले, गाडी चिखलात रुतल्याचे सांगीतले व मदत करण्याची विनंती केली ...

▪शेतकरी बाबा गाडीजवळ आले, पहाणी केली आणि म्हणाले, ‘ नामदेवला, म्हणजे नाम्याला बोलवायला लागेल ...!’

▪‘मग बोलवाना तुमच्या त्या नाम्याला! मी त्याला चांगले बक्षीस देईन! मस्त जेवायला, खायला घालेन ...!’ तो उद्योगपती म्हणाला ...

▪आहो नाम्या म्हणजे कोणी माणुस नाही. तो येक बैल आहे. मी आत्ता त्याला घेऊन येतो!’ ते शेतकरी म्हातारबाबा म्हणाले व लगेचच ‘नाम्याला’ म्हणजे त्या बैलाला घेऊन आले ...

▪त्या बैलाला दोरीच्या सहाय्याने गाडीला जुंपले आणि म्हणाले ...
‘हे हरबा खेच! हे ढवळ्या खेच! हे नाम्या खेच! हे पवळ्या खेच!’

▪त्याबरोबर त्या बैलाने जोर लाऊन ती गाडी चिखलातून खेचून बाहेर काढली. हे बधून तो उद्योगपती खुष झाला पण त्याला समजेना की गाडीला एकच बैल जुंपलेला असताना त्या म्हातारबाबांनी चार बैलांची नावे का घेतली ...

▪उद्योगपतीने त्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हातारबुवा उत्तरले ...
‘ त्याचे काय आहे! आमचा नाम्या आहे म्हातारा आणि आंधळा. त्याला दिसत नाही. त्यामुळे त्याला एकट्यालाच गाडीला जुंपले आहे हे त्याला माहीत नाही. मी अजून तीन बैलांची नावे घेतली कारण नाम्याला वाटावे की त्याच्याबरोबर अजून तीन बैल आहेत. म्हणजे तो टिममध्ये काम करतो आहे. म्हणूनच तो त्याची ताकद पणाला लाऊन सर्वोत्तम काम करून दाखवतो. साहेब तुमच्या भाषेत याला ‘टीम स्पिरीट’ म्हणतात नाही का?’

▪एका पागोटे, मुंडासेवाल्या म्हातार्‍या शेतकरीबुवांचे हे बोलणे ऐकून तो उद्योगपती चाटच पडला ...

▪या कथेतील मतितार्थ ....
👉🏻कोणतेही काम हे टिम/संघटन केल्याशिवाय होणे अशक्य जरी असले तरी त्या टिम मधिल सर्व घटकांनी कोणाचीही वाट न पाहता जर जीव ओतून व जोर लावून काम केल्यास ते कार्य अव्दितीय व चोक झाल्याशिवाय राहत नाही ...
👉🏻 आपल्या बरोबर कोणी असू नाही तर नसू आपल्यावर असणारी जबाबदारी आपण अगदी चोकपणे करु शकतो हा विश्वासच आपल्याला मनोबल देवून कार्य करुन घेण्यास सहाय्य करत असतो ...
👉🏻 आपण स्वत: म्हणजेच एक टिम आहे असे समजून व प्रत्येक सहकार्‍या बरोबर स्वत: पुढे होऊन कार्य केल्यास बरोबर असणारांचाही आत्मविश्वास वाढत असतो ...
👉🏻 टिम किंवा संघटणात्मक काम करत असताना मी बरोबर आहे तुम्ही हे करा, तुम्ही ते करा असे सांगून बघत बसणारे त्या टिमसाठी घातक मेंबर ठरतात ...
👉🏻 मी हे करु शकतो आणि मीच करणार, फक्त माला या कामात थोडी मदत करा असे म्हणून कार्य करणारे ग्रेट असतात ...

         *👉🏻 TEAM या शब्दाचा अर्थ .....✍🏻*
                   *👍🏻 T = Together ....*
                   *👍🏻 E = Everyone ...*
                   *👍🏻 A = Achieves ...*
                   *👍🏻 M = More ...*

Saturday, 1 April 2017

आंनद bank आणि love bank भाग-५

आनंदमार्ग
Way Of Happiness
लेखन-श्री. एच.बी.पुरी
नमस्कार मित्रांनो,

आनंद Bank  आणि love Bank
आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक कशी भरावी हे आपण पाहत आहोत. आजच्या भागात प्रेमाचे बँक खाते कसे भरावे यातील प्रकार पाचवा आणि शेवटचा पाहूया

५- स्पर्श
          या प्रकारातील व्यक्तींना भेटीची, सहवासाची, सकारात्मक शब्दाची, किंवा अन्य कोणतीही अपेक्षा नसते त्याना स्पर्शातून प्रेमाची जाणीव होत असते जो पर्यंत तो स्पर्श मिळत नाही तोपर्यंत त्याना आपल्या प्रेमाची खात्री पटत नाही. उदा. दिवसभर काम करून वडील जेव्हा घरी येतात तेव्हा मूल संद्यकाली त्यांना मिठी मारते. त्या मुलाला वडिलांचा स्पर्श हवा असतो. वडील सुद्धा मुलाला जवळ घेऊन आंजरतात तेव्हा मुलाला आनंद होतो म्हणजेच त्याला वडील आपल्यावर प्रेम करतात याची खात्री पटते.
       स्पर्शातून प्रेम फक्त लहान मुलांनाच हवं असत अस नाही. अनाथ आश्रमात असलेल्या सर्वच व्यक्ती या प्रेमाच्या भुकेल्या असतात , लहान थोर सगळ्याच व्यक्तींना ही भावना हवी असते . कोणाकडून तरी प्रेमाचा स्पर्श मिळावा या हेतूने ते आधार शोधत असतात. आशा व्यक्तींना आपण खरोखरच आनंदी करू शकतो फक्त आपला वेळ खर्च करावा लागेल नाही का???
         धन्यवाद !!!

Friday, 31 March 2017

आनंद bank आणि love bank भाग -४

आनंदमार्ग
Way Of Happiness
लेखन-श्री. एच.बी.पुरी
नमस्कार मित्रांनो,

आनंद Bank  आणि love Bank
आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक कशी भरावी हे आपण पाहत आहोत. आजच्या भागात प्रेमाचे बँक खाते कसे भरावे यातील प्रकार चौथा पाहूया
४-सेवा
    काही व्यक्तींच्या लेखी प्रेम याचा अर्थ सेवा हा असतो अशा व्यक्तींना सकारात्मक शब्दांची गरज नसते त्यांना भेटवस्तूची गरज नसते आपण वेळ दिला ,पिकनिक,प्रवासाला नेले तरी त्याना आपल्या प्रेमाची खात्री वाटत नाही या कृतींचा ते नेहमीच वेगळा अर्थ काढत असतात.
         सेवा हवी असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या छोट्या मोठ्या कार्यात मदत करून आपण त्यांच्या लव्ह बँकेत भर टाकू शकता. जोवर आपण त्यांच्यासाठी काही सेवाकार्य करत नाही तोवर त्यांना आपल्या प्रेमाची अनुभूतीचा येत नाही उदा. कधी आपल्या पत्नीला भांडी धुण्यासाठी पतिने मदत केली तर तिचे पतीबद्दलचे प्रेम इतके उफाळून येते,कि पतीला प्रिय असणाऱ्या गोष्टी ती आनंदाने करू लागते. आपण केलेले असे लहानसे काम जर एवढा मोठा चमत्कार घडवून आणत असेल तर मग ते काम का करू नये?
       मी पुरुष आहे.. मी हि बायकी कामे कशी करू? मी स्त्री आहे ,मी पुरुषी कामे कशी करू ?... अशी आपली धारणा असेल तर आपण खऱ्या प्रेमाचा अनुभव कधी घेऊ शकणार नाही आणि आपल्या आप्तजनांचे प्रेम मिळवू शकणार नाही..
        धन्यवाद!!
अधिक माहितीसाठी
www.aanadmarg.blogspot.com

Sunday, 26 March 2017

आंनद bank आणि love bank भाग -३

आनंदमार्ग
Way Of Happiness
लेखन-श्री. एच.बी.पुरी
नमस्कार मित्रांनो,

आनंद Bank  आणि love Bank
आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक कशी भरावी हे आपण पाहत आहोत. आजच्या भागात प्रेमाचे बँक खाते कसे भरावे यातील प्रकार  तिसरा पाहूया
३-सकारात्मक प्रतिसाद--
        व्यक्ती करत असलेल्या कामात त्याला मदत किंवा प्रेरणा किंवा अधिक मार्गदर्शन केले तर त्याला आनंद होतो . तो करत असलेल्या कामाचे कौतुक करावे अस त्याला नेहमी वाटत असते . कौतुक म्हणजेच सकारात्मक प्रतिसाद positive feedback  मिळत असेल तर व्यक्ती अधिक ऊर्जेने काम करू लागते .
       या प्रकारातील व्यक्तींना काही अपेक्षा नसते त्यांना फक्त हवं असत इतरांनी आपल्याला चांगलं म्हणावं ,कौतुक करावं, positive response ,यामुळे चुका झाल्या तरी त्या दुरुस्त होतात .
परिणामी व्यक्ती आनंदी राहते व प्रेमाची बँक पुन्हा भरू लागते.
अधिक माहितीसाठी
www.aanandmarg.blogspot.com
           धन्यवाद!!

Sunday, 19 March 2017

आनंद Bank आणि Love Bank भाग-२

आनंदमार्ग
Way Of Happiness
लेखन-श्री. एच.बी.पुरी
नमस्कार मित्रांनो,

आनंद Bank  आणि love Bank
आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक कशी भरावी हे आपण पाहत आहोत. आजच्या भागात प्रेमाचे बँक खाते कसे भरावे यातील प्रकार दुसरा पाहूया

2-  सहवास - प्रेमाचे बँक खाते भरण्याचा दुसरा पण महत्त्वपूर्ण प्रकार म्हणजे सहवास.सहवासाची ओढ सर्वाना असते लहान असो की मोठी माणसे सर्वाना आपले प्रेमाचे माणूस जवळ असावे अस वाटत. सहवासाची अपेक्षा असणाऱ्या व्यक्तीमध्ये भेट किंवा बक्षिस याची गरज नसते तर आपला संपूर्ण वेळ त्याना हवा असतो. वेळ देणं म्हणजे ऑफिस ला न जाता घरी बसून ऑफीसची काम करणं असं नाही.असं केलं तर समोरची व्यक्ती कंटाळून म्हणेल उगाच सुट्टी घेतली त्यापेक्षा ऑफिस ला जा .
         सहवासाची अपेक्षा असणाऱ्या व्यक्तींना केवळ आपला वेळ हवा असतो, सहवास हवा असतो, निखळ मनसोक्त गप्पा मारत दिवस व्यतीत करावा अस केलं तर नक्कीच प्रेमाच्या बँक खात्यात भर पडेल नाही का??
पटतय ना??
अधिक माहितीसाठी
www.aanandmarg.blogspot.com
               धन्यवाद!!

Saturday, 18 March 2017

आनंद बँक आणि love Bank भाग-१

आनंदमार्ग
Way Of Happiness
लेखन-श्री. एच.बी.पुरी
नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ

आनंद Bank  आणि love Bank
आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक भरलेली असावी असं कालच्या भागात आपण पाहिले.
प्रेमाचे बँक खाते कसे भरायचे यातील पहिला प्रकार पाहू

१. भेट,बक्षीस किंवा उपहार
प्रेम मिळवण्यासाठी हा प्रकार लहान मुलांत अधिक प्रमाणात असतो.लहान मुलांना जो पर्यंत आपण काही भेट देत नाही तो पर्यंत त्यांना आपण त्यांच्यावर प्रेम करत नाही असेच वाटते.भेट किंवा बक्षीस मिळावे अशी लहान मुलांची अपेक्षा असते कारण प्रेमाची परिभाषा त्याच्यापुरती केवळ तीच असते.
        भेट बक्षिस किंवा उपहारची अपेक्षा लहान मुलांत च असते असे नाही मोठ्या माणसांत देखील असते. भेटवस्तू अगदीच जास्त किमतीची असावी असं काही नाही.कुटुंबातील व्यक्तींना तिच्या नकळत आपण एखादी भेट देऊ केली तर तिला आनंद होतो म्हणजेच तिला जाणीव होते आपण तिच्यावर प्रेम करत आहोत. म्हणजेच प्रेमाच्या बँक खात्यात भर पडली.हा एक मात्र काळजी घ्यायला हवी कि भेटवस्तूची सवय होता कामा नये.नाहीतर प्रेम म्हणजे फक्त काहीतरी देणे आणि घेणे असं व्हायला नको.
प्रेमाचे बँक खाते कसे भरायचे हे आपण आता पहिले दुसरा प्रकार (क्रमशः)..
अधिक माहितीसाठी
www.aanandmarg.blogspot.com
            धन्यवाद!!

       

Friday, 17 March 2017

आनंद Bank आणि love Bank

आनंद Bank आणि love Bank
लेखन- श्री.एच.बी.पुरी

आपल्या आनंदाच्या बँकेतील खात्यावर जेव्हा भरपूर जमा असते तेव्हा आपण इतरांनाही आनंद वाटतो.जेव्हा त्या खात्यावरील शिल्लक कमी होते तेव्हा आपण इतरांकडून आनंद हिरावून घेण्याची ,इतरांच्या खात्यावर डल्ला मारण्याची खटपट करतो.त्याचप्रमाणे आपल्या प्रेम बँकेतील खात्यावर भरपूर शिल्लक असते तेव्हा आपण इतरांना प्रेम वाटतो.त्या खात्यावर जेव्हा बाकी शून्य होते,खाते रिकामे होते तेव्हा इतरांबद्दल आपण द्वेष,मत्सर,इर्षा करू लागतो.
            या दोन्ही बँकांचा परस्परांशी घनिष्ट संबंध आहे. एकमेकांवर त्याचा परिणाम होतो.आनंद बँकेतील खात्यावर भरपूर जमा असते तेव्हा प्रेम वाटतो;प्रेम बँकेतील खात्यावर भरपूर जमा असते तेव्हा आपण आनंदात असतो.
        आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक भरलेली असणे गरजेचे आहे.प्रेमाची बँक पुढील पाच प्रकारे भरता येऊ शकते
उपहार किंवा भेट,सहवास,सकारात्मक प्रतिसाद, सेवा आणि स्पर्श..
      वरील पाचही प्रकार विस्तृतपणे मांडणार आहे उद्या पासून... (क्रमशः)
    

मनसोक्त जगा

सांगावंसं वाटतंय की, विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं, तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना? पण विरहाचं रुपांतर वियोगातच झालं, तर हळहळणं आणि उरलेलं आयुष्य मनस्तापात, दु:खात घालवणं याशिवाय पर्यायच राहणार नाही, नाही का?

माझ्या अगदी परिचयातला एक जण असाच हळहळत असतो. कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर त्याला वडिलांची आठवण होते. ते म्हणाले होते, "मला एकदा हॉटेलमध्ये डोसा खायचा आहे रे"

"जाऊया की मग...त्यात काय? उद्याच नेतो तुम्हाला." असं आश्वासन देऊन तो बाहेर गेला आणि तो *उद्या* आयुष्यात कधी उगवलाच नाही. कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच रात्री वडिलांना हार्ट अॅटॅक! आणि जगाचा निरोप!

मुंबईत ताज-ओबेरॉयचा अतिरेकी हल्ला काय किंवा रेल्वेमध्ये झालेले बॉम्बस्फोट काय...कितीतरी जणांचे *उद्या* गिळंकृत करून गेले आणि वेदनांचे डंख जगणाऱ्यांसाठी ठेवून गेले. पेपरमध्ये त्यांच्या करुण कहाण्या छापून आल्या, तेव्हा कुणी आई म्हणत होती
*"अभ्यास करत नाही  म्हणून रागवायचे मी त्याला...आता?"*

*"नेहमी भांडायचो आम्ही...माहेरी जाईन, घटस्फोट देईन पर्यंत जायची भांडणं, आता?"*, कुणी एक विधवा साश्रूनयनांनी विचारत होती

नाती, माणसं असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो नं आपण?
जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्याची किंमत. पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि...आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असतं.

म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी राहील उभा!

सकाळी उठताना कंटाळा येतो? मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य उगवतो? कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो...मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल. आळसाला रामराम ठोकावासा वाटेल...

नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग

स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं

अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत

भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये *प्रेझेंट* म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं.

सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोकं आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की, अस्वस्थ व्हायला होतं.

एकत्र कुटुंबात राहणाऱ्याला घरं तोडून स्वतंत्र व्हायचे डोहाळे लागले की, वाईट वाटतं.

आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही,ह्या भाग्याला  सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही?

अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात...

आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं.

सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलमधले रोगांशी झुंजणारे पेशंट दाखवावेसे वाटतात .

जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावसं वाटतं.

श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो.

*अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर ...?*

पिक्चरच्या  शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. *पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात.*

*म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न हवंहवंसं जगलं तर...?*

Friday, 25 November 2016

सुख एक मृगजळ

🌷सुख हे खरोखरीच मृगजळ आहे का ?

सामान्य लोकांना सुख म्हणजे काय हे समजत तर नाहीच पण मोठमोठया विद्वान लोकांना सुध्दां सुख हे मृगजळ आहे असे वाटते .

याचे मुख्य कारण असे की , माणसे सुखाचा अमृतानुभव अनुभवण्याऐवजी ते सुखाच्या कल्पनेचा काल्पनिक भोग घेत असतात .

सुखाची कांही तरी कल्पना करुन घेऊन त्याच्या पाठीमागे लागल्याने सुख हाताला लागेलच कसे ? आणि अशा प्रसंगी सुख हे मृगजळ आहे असे म्हणण्यात काय अर्थ आहे बरे ?

लोक ज्या मार्गाने सुख शोधण्याचा प्रयत्न करतात त्याच्या नेमका उलटा मार्ग लोकांना ज्ञात नसल्यामुळे लोकांना सुखाचा शोध लागत नाही .

वास्तविक , ज्या जीवाला  सुखाचा ध्यास लागलेला असतो आणि जो त्या सुख प्राप्तीसाठी कशाचाही व कोणाचाही ध्यास व्हावयास तत्पर असतो , तो जीव स्वतःच पूर्णतः सुखस्वरुप असतो .

सुख मिळविण्यासाठी माणुस जितके अधिक प्रयत्न करतो तितका तो सुखापासून दूरदूर फेकला जातो .

याच्या उलट सुख मिळविण्याची धडपड करण्याचे माणसाने बंद केले व एका विशीष्ट सदगुरुप्रणित मार्गाने स्वतःच्या सुख स्वरुपाचे ज्ञान करुन घेतले की त्याला सुखाचा साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष अनुभव तात्काळ येऊ शकतो .

म्हणुनच तुकाराम महाराज सांगतात -

१) बैसोनि निवांत शुध्द करी चित्त ।तया सुख अंत नाही पार ।
येऊनी अंतरी राहील गोपाळ । सायासाचे फळ बैसलीया ।।

२) तुका म्हणे सुख देह निरसने । चिंतन चिंतने तद्रुपता ।।

 
       *卐 शुभ चिंतनमय क्षण 卐*
           
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

Thursday, 21 July 2016

आनंद सर्वव्यापी आहे

आनंदमार्ग
लेखन - श्री. एच. बी. पुरी

आनंद हा सर्वव्यापी आहे. ...
 
   उगाचच जगायचे आहे म्हणून जगण्यात काय अर्थ आहे?  स्वतःसाठी जगत असताना  दुसऱ्यासाठी जगण्याची संधी शोधत रहा. लहानांत लहान बनून खेळण्यात आनंद आहे, कळीचे फुलात रुपांतर बघण्यात आनंद आहे, मित्रासोबत गप्पा मारण्यात आनंद आहे, वृद्धांना मदत करण्यात आनंद आहे, दीन दुबळ्या गरीब भुकेलेल्यास अन्नदान करण्यात आनंद आहे, परिवार, कुटुंबाची काळजी घेण्यात आनंद आहे, निस्वार्थ प्रेम करण्यात आनंद आहे.
       सुख दुख, यश अपयश , जास्त श्रीमंत बनण्याचा हव्यास , या सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करण्यात आनंद आहे. दुसऱ्याची अवहेलना करण्यापेक्षा स्वताला आरशात बघण्यात आनंद आहे. काम, क्रोध, लोभ,मद मत्सर, द्वेष या षडरिपुंचा त्याग करण्यात आनंद आहे.
      निखळ आनंद , सुख, समाधान , शांतता हवी असेल तर ती आपणच आपल्या आयुष्यात आणू शकतो. आनंदाच्या डोहात आनंदाचेच तरंग निर्माण होतात. म्हणूनच आनंद हा सर्वव्यापी आहे. शोधा म्हणजे सापडेल. नाही का? ???
                                 धन्यवाद !

Wednesday, 13 July 2016

कामातील आनंद

आनंदमार्ग
लेखन - श्री. एच. बी. पुरी
कामात लपलेल्या अानंदाचे कंगोरे शोधा प्रत्येक कामात आनंदाची एखादी गोष्ट असते. तुम्हाला त्याचे कंगाेरे शोधायचे आहेत. कामानेच आनंद मिळेल.

सकाळी उठल्यानंतर फक्त दाेन मिनिटे आरशासमोर उभे राहा आणि कल्पना करा की, दिवसभरात तुम्हाला काय मिळवायचे आहे. जे काम कराल, मन लावून करा. तसे केले तरच आनंद मिळतो आणि यशही मिळेल. चांगले काम कधी वाया जात नाही कोणतेही चांगले काम कधी वाया जात नाही. मग ते कितीही लहान असो.

दुसऱ्यासाठी काही ना काही करत राहा. बसमध्ये गरजूंना आपले अासन द्या. कोणासाठी दरवाजे उघडा, कोणाच्या कपड्याचे कौतुक करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होईल. "Be Positive, Be Active " धन्यवाद !!

प्रयत्नशील बना

प्रयत्नशील बना
लेखन -श्री. एच. बी. पुरी

पावसाचे थेंब भलेही छोटे- छोटे असूद्या पण जर पाऊस सतत सुरू राहिला तर मोठ्या जलाशयात रूपांतर होते. असेच आपले छोटे छोटे प्रयत्न निश्चितच जीवन परिवर्तन करण्यास सहाय्यक ठरतील.

प्रयत्न किंवा साहस छोटे किंवा मोठे हे महत्वाचे नाही तर त्यात सातत्य असणे  आवश्यक आहे. माणूस प्रयत्नवादाने काहीही करू शकतो. नदीच्या काठावर बसून राहिला तर त्याला पोहता येणार आहे का?  पाण्यात पडल्यावर हात पाय हलवून नक्की पोहता येते.

म्हणून "Try Try But Don't Cry"
प्रयत्न करत रहा यशाची पहिली पायरी चढणे  सोपे जाईल.
                                           धन्यवाद !!

पाॅलिश पेपर

पाॅलिश पेपर
लेखन - एच. बी. पुरी

जीवन जगत असताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात. अनुभवाने माणूस शहाणा होतो यावर माझा ठाम विश्वास आहे. "Nothing in the world good or bad we make it". या जगात चांगले आणि वाईट असे काहीच नसते आपण ते ठरवतो. चांगल्याला वाईट म्हणणारे लोक असतात आणि वाईटाला चांगले म्हणणारेही लोक असतात. असो. ...
    आपली प्रगती जर आपल्याला करायची असेल तर आपण कमळाच्या पानांसारखे रहायला हवं. म्हणजे बघा कमळ पाण्यात, चिखलात फुलते मात्र त्यावर पाणी साचत नाही किंवा चिखलही साचत नाही.
      आता पाॅलिश पेपर म्हणजे  काय ते सांगतो . असे म्हणतात "निंदकाचे घर असावे शेजारी" कारण जे आपली निंदा करतात ते आपल्यासाठी पाॅलिश पेपर सारखे काम करतात. निंदा करणारे आपल्या त्रुटी, दोष दूर करण्याचे काम करतात आणि मग आपण अधिकाधिक चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजेच आपल्याला प्रेरणा मिळते. 
       म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात असं मला वाटतं. पटतयं का?

Monday, 4 April 2016

विचार करून पहा

रेल्वेच्या खिडकीत बसून. प्रवास करणाऱा२४ वर्षाच्या मुलगा मोठ्याने ओरडून आपल्या वडिलांना म्हणाला, पप्पा बघा झाड मागे पळत अाहेत.वडील त्याच्याकडे पाहून हसले.त्यांच्या समोर एक जोडप बसले होते.त्यांना तो मुलगा अबनार्मल वाटला इतक्यात तो मुलगा परत ओरडला, पप्पा ढग आपल्या बरोबर पळत आहेत. समोर बसलेले जोडपे त्या मुलांच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही मुलाला चांगल्या डाक्टर कडे का नाही दाखवत.वडील हसले आम्ही आता हास्पीटल मधूनच येत अाहोत. माझा मुलगा जन्मतःच अंध आहे.त्याला अाजच डोळे मिळाले.
या जगातील प्रत्येक माणसाची एक वेगळी कथा असते. समोरच्या माणसाबद्दल खात्री असल्याशिवाय आपले मत बनवू नये. कारण सत्य हे कदाचित आश्चर्यकारक असू शकते.....

Tuesday, 15 March 2016

विचार आणि भावना

ॐ मंत्र सोपा. .

“ॐ” हे अक्षर हिंदू धर्मियांकरीता अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक बाब असली तरीही एवढ्यापुरताच ह्या अक्षराचे महत्व मर्यादित नाही. ॐ नामाचा नियमित जप आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी पहाटे लवकर उठून ओंकाराचा जप करावा. ॐ नामाचा उच्चार पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन, वज्रासन करीत असतांनाही आपण करू शकतो. ॐ नामाचा जप केल्याने खालील फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात….
१) अनेक वेळा ॐ अक्षराचा जप केल्याने पूर्ण शरीर तणावमुक्त होतं.
२) घाबरल्यासारखे वाटणे किंवा बेचैनी यांवर ॐ अक्षराचा जप करणे सर्वांत उत्तम उपाय आहे.
३) ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरातील नकारात्मक तत्व दूर होतात तसेच तणावाच्या परिस्थितीत उत्पन्न होणाऱ्या द्रव्यांवरदेखील नियंत्रण ठेवले जाते.
४) ॐ अक्षराचा जप केल्यास हृदय आणि रक्ताभिसरण संतुलित राहते.
५) ॐ अक्षराचा जप केल्यास पचनशक्ती सुधारते.
६) ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरात तरुणावस्थेतील उत्साह पुन्हा परत येतो.
७) थकव्यापासून बचावासाठी ॐ अक्षराचा जप करण्याव्यतिरिक्त दुसरा चांगला उपाय नाही.
८) ॐ अक्षराचा जप केल्याने झोप न येण्याच्या समस्येपासून त्वरित सुटका मिळते. रात्री झोपतांना झोप येईपर्यंत ॐ अक्षराचा जप केल्यास झोप येणे निश्चित आहे.
९) प्राणायाम करण्याच्या काही विशेष पद्धतींमध्ये ॐ अक्षराचा जप केल्यास फुफ्फुसांमध्ये मजबुती येते.
१०) ॐ च्या पहिल्या शब्दाचा उच्चार केल्यास शरीरात कंपन तयार होते. ह्या कंपनाने पाठीचा कणा प्रभावित होऊन त्याची क्षमता वाढते.
ॐ च्या दुसऱ्या शब्दाचा उच्चार केल्यास गळ्यात कंपन तयार होते. हे कंपन थायरॉईड ग्रंथीवर प्रभाव टाकते.