Friday, 25 November 2016

सुख एक मृगजळ

🌷सुख हे खरोखरीच मृगजळ आहे का ?

सामान्य लोकांना सुख म्हणजे काय हे समजत तर नाहीच पण मोठमोठया विद्वान लोकांना सुध्दां सुख हे मृगजळ आहे असे वाटते .

याचे मुख्य कारण असे की , माणसे सुखाचा अमृतानुभव अनुभवण्याऐवजी ते सुखाच्या कल्पनेचा काल्पनिक भोग घेत असतात .

सुखाची कांही तरी कल्पना करुन घेऊन त्याच्या पाठीमागे लागल्याने सुख हाताला लागेलच कसे ? आणि अशा प्रसंगी सुख हे मृगजळ आहे असे म्हणण्यात काय अर्थ आहे बरे ?

लोक ज्या मार्गाने सुख शोधण्याचा प्रयत्न करतात त्याच्या नेमका उलटा मार्ग लोकांना ज्ञात नसल्यामुळे लोकांना सुखाचा शोध लागत नाही .

वास्तविक , ज्या जीवाला  सुखाचा ध्यास लागलेला असतो आणि जो त्या सुख प्राप्तीसाठी कशाचाही व कोणाचाही ध्यास व्हावयास तत्पर असतो , तो जीव स्वतःच पूर्णतः सुखस्वरुप असतो .

सुख मिळविण्यासाठी माणुस जितके अधिक प्रयत्न करतो तितका तो सुखापासून दूरदूर फेकला जातो .

याच्या उलट सुख मिळविण्याची धडपड करण्याचे माणसाने बंद केले व एका विशीष्ट सदगुरुप्रणित मार्गाने स्वतःच्या सुख स्वरुपाचे ज्ञान करुन घेतले की त्याला सुखाचा साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष अनुभव तात्काळ येऊ शकतो .

म्हणुनच तुकाराम महाराज सांगतात -

१) बैसोनि निवांत शुध्द करी चित्त ।तया सुख अंत नाही पार ।
येऊनी अंतरी राहील गोपाळ । सायासाचे फळ बैसलीया ।।

२) तुका म्हणे सुख देह निरसने । चिंतन चिंतने तद्रुपता ।।

 
       *卐 शुभ चिंतनमय क्षण 卐*
           
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

Thursday, 21 July 2016

आनंद सर्वव्यापी आहे

आनंदमार्ग
लेखन - श्री. एच. बी. पुरी

आनंद हा सर्वव्यापी आहे. ...
 
   उगाचच जगायचे आहे म्हणून जगण्यात काय अर्थ आहे?  स्वतःसाठी जगत असताना  दुसऱ्यासाठी जगण्याची संधी शोधत रहा. लहानांत लहान बनून खेळण्यात आनंद आहे, कळीचे फुलात रुपांतर बघण्यात आनंद आहे, मित्रासोबत गप्पा मारण्यात आनंद आहे, वृद्धांना मदत करण्यात आनंद आहे, दीन दुबळ्या गरीब भुकेलेल्यास अन्नदान करण्यात आनंद आहे, परिवार, कुटुंबाची काळजी घेण्यात आनंद आहे, निस्वार्थ प्रेम करण्यात आनंद आहे.
       सुख दुख, यश अपयश , जास्त श्रीमंत बनण्याचा हव्यास , या सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करण्यात आनंद आहे. दुसऱ्याची अवहेलना करण्यापेक्षा स्वताला आरशात बघण्यात आनंद आहे. काम, क्रोध, लोभ,मद मत्सर, द्वेष या षडरिपुंचा त्याग करण्यात आनंद आहे.
      निखळ आनंद , सुख, समाधान , शांतता हवी असेल तर ती आपणच आपल्या आयुष्यात आणू शकतो. आनंदाच्या डोहात आनंदाचेच तरंग निर्माण होतात. म्हणूनच आनंद हा सर्वव्यापी आहे. शोधा म्हणजे सापडेल. नाही का? ???
                                 धन्यवाद !

Wednesday, 13 July 2016

कामातील आनंद

आनंदमार्ग
लेखन - श्री. एच. बी. पुरी
कामात लपलेल्या अानंदाचे कंगोरे शोधा प्रत्येक कामात आनंदाची एखादी गोष्ट असते. तुम्हाला त्याचे कंगाेरे शोधायचे आहेत. कामानेच आनंद मिळेल.

सकाळी उठल्यानंतर फक्त दाेन मिनिटे आरशासमोर उभे राहा आणि कल्पना करा की, दिवसभरात तुम्हाला काय मिळवायचे आहे. जे काम कराल, मन लावून करा. तसे केले तरच आनंद मिळतो आणि यशही मिळेल. चांगले काम कधी वाया जात नाही कोणतेही चांगले काम कधी वाया जात नाही. मग ते कितीही लहान असो.

दुसऱ्यासाठी काही ना काही करत राहा. बसमध्ये गरजूंना आपले अासन द्या. कोणासाठी दरवाजे उघडा, कोणाच्या कपड्याचे कौतुक करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होईल. "Be Positive, Be Active " धन्यवाद !!

प्रयत्नशील बना

प्रयत्नशील बना
लेखन -श्री. एच. बी. पुरी

पावसाचे थेंब भलेही छोटे- छोटे असूद्या पण जर पाऊस सतत सुरू राहिला तर मोठ्या जलाशयात रूपांतर होते. असेच आपले छोटे छोटे प्रयत्न निश्चितच जीवन परिवर्तन करण्यास सहाय्यक ठरतील.

प्रयत्न किंवा साहस छोटे किंवा मोठे हे महत्वाचे नाही तर त्यात सातत्य असणे  आवश्यक आहे. माणूस प्रयत्नवादाने काहीही करू शकतो. नदीच्या काठावर बसून राहिला तर त्याला पोहता येणार आहे का?  पाण्यात पडल्यावर हात पाय हलवून नक्की पोहता येते.

म्हणून "Try Try But Don't Cry"
प्रयत्न करत रहा यशाची पहिली पायरी चढणे  सोपे जाईल.
                                           धन्यवाद !!

पाॅलिश पेपर

पाॅलिश पेपर
लेखन - एच. बी. पुरी

जीवन जगत असताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात. अनुभवाने माणूस शहाणा होतो यावर माझा ठाम विश्वास आहे. "Nothing in the world good or bad we make it". या जगात चांगले आणि वाईट असे काहीच नसते आपण ते ठरवतो. चांगल्याला वाईट म्हणणारे लोक असतात आणि वाईटाला चांगले म्हणणारेही लोक असतात. असो. ...
    आपली प्रगती जर आपल्याला करायची असेल तर आपण कमळाच्या पानांसारखे रहायला हवं. म्हणजे बघा कमळ पाण्यात, चिखलात फुलते मात्र त्यावर पाणी साचत नाही किंवा चिखलही साचत नाही.
      आता पाॅलिश पेपर म्हणजे  काय ते सांगतो . असे म्हणतात "निंदकाचे घर असावे शेजारी" कारण जे आपली निंदा करतात ते आपल्यासाठी पाॅलिश पेपर सारखे काम करतात. निंदा करणारे आपल्या त्रुटी, दोष दूर करण्याचे काम करतात आणि मग आपण अधिकाधिक चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजेच आपल्याला प्रेरणा मिळते. 
       म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात असं मला वाटतं. पटतयं का?

Monday, 4 April 2016

विचार करून पहा

रेल्वेच्या खिडकीत बसून. प्रवास करणाऱा२४ वर्षाच्या मुलगा मोठ्याने ओरडून आपल्या वडिलांना म्हणाला, पप्पा बघा झाड मागे पळत अाहेत.वडील त्याच्याकडे पाहून हसले.त्यांच्या समोर एक जोडप बसले होते.त्यांना तो मुलगा अबनार्मल वाटला इतक्यात तो मुलगा परत ओरडला, पप्पा ढग आपल्या बरोबर पळत आहेत. समोर बसलेले जोडपे त्या मुलांच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही मुलाला चांगल्या डाक्टर कडे का नाही दाखवत.वडील हसले आम्ही आता हास्पीटल मधूनच येत अाहोत. माझा मुलगा जन्मतःच अंध आहे.त्याला अाजच डोळे मिळाले.
या जगातील प्रत्येक माणसाची एक वेगळी कथा असते. समोरच्या माणसाबद्दल खात्री असल्याशिवाय आपले मत बनवू नये. कारण सत्य हे कदाचित आश्चर्यकारक असू शकते.....

Tuesday, 15 March 2016

विचार आणि भावना

ॐ मंत्र सोपा. .

“ॐ” हे अक्षर हिंदू धर्मियांकरीता अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक बाब असली तरीही एवढ्यापुरताच ह्या अक्षराचे महत्व मर्यादित नाही. ॐ नामाचा नियमित जप आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी पहाटे लवकर उठून ओंकाराचा जप करावा. ॐ नामाचा उच्चार पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन, वज्रासन करीत असतांनाही आपण करू शकतो. ॐ नामाचा जप केल्याने खालील फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात….
१) अनेक वेळा ॐ अक्षराचा जप केल्याने पूर्ण शरीर तणावमुक्त होतं.
२) घाबरल्यासारखे वाटणे किंवा बेचैनी यांवर ॐ अक्षराचा जप करणे सर्वांत उत्तम उपाय आहे.
३) ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरातील नकारात्मक तत्व दूर होतात तसेच तणावाच्या परिस्थितीत उत्पन्न होणाऱ्या द्रव्यांवरदेखील नियंत्रण ठेवले जाते.
४) ॐ अक्षराचा जप केल्यास हृदय आणि रक्ताभिसरण संतुलित राहते.
५) ॐ अक्षराचा जप केल्यास पचनशक्ती सुधारते.
६) ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरात तरुणावस्थेतील उत्साह पुन्हा परत येतो.
७) थकव्यापासून बचावासाठी ॐ अक्षराचा जप करण्याव्यतिरिक्त दुसरा चांगला उपाय नाही.
८) ॐ अक्षराचा जप केल्याने झोप न येण्याच्या समस्येपासून त्वरित सुटका मिळते. रात्री झोपतांना झोप येईपर्यंत ॐ अक्षराचा जप केल्यास झोप येणे निश्चित आहे.
९) प्राणायाम करण्याच्या काही विशेष पद्धतींमध्ये ॐ अक्षराचा जप केल्यास फुफ्फुसांमध्ये मजबुती येते.
१०) ॐ च्या पहिल्या शब्दाचा उच्चार केल्यास शरीरात कंपन तयार होते. ह्या कंपनाने पाठीचा कणा प्रभावित होऊन त्याची क्षमता वाढते.
ॐ च्या दुसऱ्या शब्दाचा उच्चार केल्यास गळ्यात कंपन तयार होते. हे कंपन थायरॉईड ग्रंथीवर प्रभाव टाकते.

Sunday, 13 March 2016

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. ...

"" प्रेम  ""
          Prem(Love)

एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.

त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी
मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला
हवी, असा तिचा कटाक्ष असे.

त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची
राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती
तिच्या मनात नेहमीच असते.

दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्या सारखा
असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत
असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा
ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर
पडण्याचा मार्ग सांगतो.

तिचा पहिला मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात
त्याचा मोठा सहभाग असतो. तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर
खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.

एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप
कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो, ""माझ्या कडे
भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू
होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.

ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, "मी तुझ्यावर सर्वाधिक
प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप
काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्या बरोबर येशील ना? माझी साथ
करशील ना?''

"अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.

त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.

त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. "आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले.
आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही'' म्हणतो. " जीवन खूप सुंदर आहे. तू
गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''

त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.

आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""मी नेहमीच तुझ्याकडे मदतीच्या
अपेक्षेने येते. तूही मला मदत करतोस. माझ्या सुख-दुःखात सहभागी होतोस. यावेळीही
तसाच वागशील ना..? येशील ना माझ्या बरोबर....?''

""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमी पर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''

त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

.... तेवढ्यात एक आवाज येतो, "मी येईन तुझ्या बरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी
येईन.''

ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणा अभावी,
दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
मुलगी म्हणते, " मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून
गेली आहे.''

वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.

आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले
पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.

आपला तिसरा मित्र म्हणजे, आपली
मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप
दुसऱ्याचे होते.

दुसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या
कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमी पर्यंतच करू शकतात.

आणि पहिला मित्र म्हणजे कोण....?........

... पहिला मित्र म्हणजे आपला 'अंतरात्मा' (परमेश्वेर) ज्याच्याकडे आपण जास्त
लक्ष देत नहीं अणि तोच आपला शेवटपर्यंत सोबती असतो....
🔹नाती जपण्यात मजा आहे
🔸बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे.
🔹जुळलेले सूर गाण्यात मजा आहे.
🔸येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
🔹नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
🔸येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं  मनजे हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं
🔹याच प्रश्नाचे उत्तर
शोधण्या साठी जन्माला यायचं असतं.

Friday, 4 March 2016

वाढदिवस

आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आज मी तिला लाख लाख शुभेच्छा देतो, माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो. प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा, कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा. तुझ्या जीवनात कधी दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी. देवाने तुला इतके सुख द्यावे, की तु एका दुःखासाठी तरसावी. आज देवाला हात जोडूणी सांगतो, तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो. की हे देवा माझ्या पत्नीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे. त्याच्यासाठी जर कुणाचा जीव पाहीजे असल्यास तर माझे प्राण आनंदाने घ्यावे..... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...............!

संसार

संसार म्हणजे चालायचचं !!

घर कितीही आवरलं
तरी दिवसभर पसरायचंच.
कट्टा पुसून ठेवला की
दुध उतू जायचंच
संसार म्हणजे चालायचचं.

रविवारी एखाद्या खूष होऊन
हॉटेलात मोठ्ठ बिल करायचं.
खिरीतल्या वेलदोड्याचे टरफल मात्र
चहाच्या डब्यात जायचंच.
संसार म्हणजे चालायचचं.

पोरांसाठी सगळं करतो म्हणलं
तरी कधी त्यांनाच रागवायचं.
रडून झोपले की
पांघरूण घालताना कुरवाळायचं
संसार म्हणजे चालायचचं.

बाहेर कितीही चेष्टा केली तरी
तू मला आणि मीच तुला ओळखयाच.
शॉपिंग ला गेल्यावर,
दोघांनी एकाच स्वस्त वस्तूला उचलायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

धावपळ करून का होईना
चौकोनी कुटुंब सांभाळायचं.
आजारी पडल्यावर, सगळा धीर गळून 
आई-बाबांनाच आठवायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

जरा एका जागी स्थिरावलं की
पुढे जायला बस्तान हलवायचं.
आधीचं सोडून चूक तर नाही न केली
हे एकमेकांना विचारायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

छोट्या छोट्या गोष्टींवरून
तुझं माझं भांडण व्हायचंच.
आयुष्य मात्र सगळं विसरून
एकत्र  होऊन जगायचं.
संसार म्हणजे चालायचचं.

Thursday, 3 March 2016

अपेक्षा

रात के समय एक दुकानदार अपनी दुकान बन्द ही कर रहा था
कि एक कुत्ता दुकान में आया । उसके मुॅंह में एक थैली थी। जिसमें सामान की लिस्ट और पैसे थे।

दुकानदार ने पैसे लेकर सामान उस थैली में भर दिया।
कुत्ते ने थैली मुॅंह मे उठा ली और चला गया।

दुकानदार आश्चर्यचकित होके कुत्ते के पीछे पीछे गया

ये देखने की इतने समझदार कुत्ते का मालिक कौन है।

कुत्ता बस स्टाॅप पर खडा रहा। थोडी देर बाद एक बस आई जिसमें चढ गया।

कंडक्टर के पास आते ही अपनी गर्दन आगे कर दी।
उस के गले के बेल्ट में पैसे और उसका पता भी था।

कंडक्टर ने पैसे लेकर टिकट कुत्ते के गले के बेल्ट मे रख दिया।

अपना स्टाॅप आते ही कुत्ता आगे के दरवाजे पे चला गया और पूॅंछ हिलाकर कंडक्टर को इशारा कर दिया।
बस के रुकते ही उतरकर चल दिया।

दुकानदार भी पीछे पीछे चल रहा था।
कुत्ते ने घर का दरवाजा अपने पैरोंसे २-३ बार खटखटाया।

अन्दर से उसका मालिक आया और लाठी से उसकी पिटाई कर दी।

दुकानदार ने मालिक से इसका कारण पूछा । मालिक बोला

"साले ने मेरी नींद खराब कर दी। चाबी साथ लेके नहीं जा सकता था गधा।"

जीवन की भी यही सच्चाई है। आपसे लोगों की अपेक्षाओं का कोई अन्त नहीं है।

जहाँ आप चूके
वहीं पर बुराई निकाल लेते हैं
और पिछली सारी अच्छाईयों को
भूल जाते हैं।

। यही संसार हैं ।

Thursday, 4 February 2016

ह्रुदयस्पर्शी

प्रत्येक वडिलांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही
हा लेख वाचणार नसाल तर तर परत लेख मि पाठवणार नाही

‼ "हृदयस्पर्शी" ‼

.
एक मध्यमवर्गीय कुटुंब
आई-बाबा आणि तरुण मुलगा!

अमित (एक काल्पनिक नाव) आपल्या आईबाबांबरोबर राहत
होता . . .
.
अगदी हुशार , प्रामाणिक
आणि आईबाबांवर जीवापाड प्रेम करणारा !
.
परंतु अमित college
ला जायला लागल्यापासून
थोडा बिघडायला लागला,
.
त्याला मित्रांची संगत लागली,
आणि काही दिवसांनी तर तो रात्र-रात्रभर बाहेरच असायचा,
.
त्याच्या बाबांना याची खूप चिंता वाटू लागली,

आपल्याला न सांगता हा रोज कुठे जात असेल ?

२-३ महिने तर तो असाच वागत होता,

उशिरा येणं,
सकाळी लवकर जाणं,
अभ्यास
न करणं,
आणि
फक्त laptop वर बसून उचापत्या करणं . . . .
.
एक दिवस व्हायचे तेच झाले ,

अमित रात्री उशिरा आला खरा पण
त्याला चालायची सुद्धा शुद्ध नव्हती ,
.
पण का कोण जाणे त्याने,.. आईला घट्ट मिठी मारली व रडू लागला,
.
आईने त्याला सावरलं...
तरी तो बाबांना सुद्धा घट्ट मिठी मारून रडू लागला . . . .
.
बाबांना ह्या वेळी मात्र राग
आवरला नाही,
त्यांनी त्याच्या जोरात कानाखाली मारली . . .

आणि जे त्यांनी कधी स्वप्नातही पाहिले
नव्हते ते घडले,
.
अमितच्या तोंडातून रक्त
बाहेर आले आणि तो जमिनीवर कोसळला !
.
तेवढ्यात बाहेरून त्याचे मित्र धावत आले,
.
ते खुश दिसत होते परंतु समोरचं दृश्य पाहून ते थबकुनच गेले . . .
.
त्यातला एक पुढे आला आणि त्याच्या बाबांना समजावू लागला,
.
"बाबा तुमचा अमित नाही राहिला",
.
आई अमित जवळ बसून रडू लागली,
पण बाबा मात्र निशब्द झाले,
त्यांना काहीच कळलं नाही...
.
"बाबा तुम्ही जे समजत होतात तसं काहीच नव्हतं",
.
"३ महिन्यापूर्वी अमित college मध्ये असताना त्याला चक्कर आली,
.
तेव्हां तातडीने आम्ही त्याचे reports काढले,
.
बाबा अमितला blood cancer
होता."
.
हे त्याला कळलं तेव्हां त्यानेच
आम्हांला सांगितलं कि आई
बाबांना काहीच सांगू नका,
.
त्यांना दुःखी झालेलं
मला नाही बघवणार !
.
त्याला माहित होतं कि तो जास्त दिवस नाही जगणार,
.
"बाबा त्यानंतर २-३ महिने तो college ला नाही गेला,
त्याच्या सोबत आम्ही त्याच्या स्वप्नातला music album
Launch करण्यासाठी झगडत
होतो. . .
.
त्याचं एकच म्हणणं होतं
कि मी जायच्या आत आई-
बाबांना कसलीही कमी भासणार नाही असं काम करून जाईन."
.

"बाबा हा घ्या blank cheque,
.
कंपनीने अमितचे Songs ऐकून हा blank cheque दिला आहे."
.
बाबा कोसळले, आणि अमितचा देह मांडीवर घेऊन त्याच्याकडे बघत राहिले,
.
आज अमित नव्हता,
पण आई-बाबांसाठी खूप काही करून गेला होता.
.

अनेकदा असं होतं, आई-बाबांना वाटतं कि आपला मुलगा वाया गेला,
.
पण काही वेळा तसं नसतं हो,

तुमच्यासाठी झटणारे पण काही मुलं असतात,

त्यांना विश्वासात घ्या,

त्यांचे चांगले मित्र व्हा,

रोज त्यांच्याशी हितगुज करा,

त्यांना त्यांची ध्येय विचारा,

तुमच्या मुलांमध्ये सुद्धा कला असेल,
कधी कधी तुम्हाला मान
खाली घालावी लागू नये,
म्हणून Arts ची आवड असून सुद्धा Science घेऊन बसतात,

स्वत:च्या स्वप्नांना दूर ठेवून, फक्त
तुमच्या स्वप्नांसाठी . . .
.
आवडल्यास शेयर जरूर करा मित्रांनो . . .

अंतरंगाची सेल्फी

खरा सेल्फी........!

दिवसभर काय काय केलं ? कुणाकुणाला किती वेळा रागवलो ? कुणाचे मन दुखावले ?
कुणावर ओरडलो ?
कुणाकुणाला आनंद दिला ?
कुणाच्या चेह-यावर हसू आणले ?
काय नको तसे वागलो,
काय हवे तसे वागलो,
. . . वगैरे गोष्टींचा विचार करणे, त्या टिपणे म्हणजे अंतरंगाचा सेल्फी. . .  !!

रात्री या सर्वांचा विचार करायचा,  जे जे आज चुकले ते ऊद्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करायचा. . .
      चेहर्‍याचा सेल्फीपेक्षा अंतरंगाची सेल्फी महत्वाचा असते.
   

Tuesday, 2 February 2016

You are unique

एक आदमी ने भगवान बुद्ध  से पुछा : जीवन का मूल्य क्या है?

बुद्ध  ने उसे एक Stone दिया और कहा : जा और इस stone का
मूल्य पता करके आ , लेकिन ध्यान रखना stone को बेचना नही है I

वह आदमी stone को बाजार मे एक संतरे वाले के पास लेकर गया और बोला : इसकी कीमत क्या है?

संतरे वाला चमकीले stone को देखकर बोला, "12 संतरे लेजा और इसे मुझे दे जा"

आगे एक सब्जी वाले ने उस चमकीले stone को देखा और कहा
"एक बोरी आलू ले जा और इस stone को मेरे पास छोड़ जा"

आगे एक सोना बेचने वाले के
पास गया उसे stone दिखाया सुनार उस चमकीले stone को देखकर बोला,  "50 लाख मे बेच दे" l

उसने मना कर दिया तो सुनार बोला "2 करोड़ मे दे दे या बता इसकी कीमत जो माँगेगा वह दूँगा तुझे..

उस आदमी ने सुनार से कहा मेरे गुरू ने इसे बेचने से मना किया है l

आगे हीरे बेचने वाले एक जौहरी के पास गया उसे stone दिखाया l

जौहरी ने जब उस बेसकीमती रुबी को देखा , तो पहले उसने रुबी के पास एक लाल कपडा बिछाया फिर उस बेसकीमती रुबी की परिक्रमा लगाई माथा टेका l

फिर जौहरी बोला , "कहा से लाया है ये बेसकीमती रुबी? सारी कायनात , सारी दुनिया को बेचकर भी इसकी कीमत नही लगाई जा सकती ये तो बेसकीमती है l"

वह आदमी हैरान परेशान होकर सीधे बुद्ध  के पास आया l

अपनी आप बिती बताई और बोला "अब बताओ भगवान , मानवीय जीवन का मूल्य क्या है?

बुद्ध  बोले :

संतरे वाले को दिखाया उसने इसकी कीमत "12 संतरे" की बताई l

सब्जी वाले के पास गया उसने इसकी कीमत "1 बोरी आलू" बताई l

आगे सुनार ने "2 करोड़" बताई lऔर जौहरी ने इसे "बेसकीमती" बताया l

अब ऐसा ही मानवीय मूल्य का भी है l

तू बेशक हीरा है..!!लेकिन, सामने वाला तेरी कीमत,
अपनी औकात - अपनी जानकारी -  अपनी हैसियत से लगाएगा।

घबराओ मत दुनिया में.. तुझे पहचानने वाले भी मिल जायेगे।

Respect Yourself,
You are very Unique..👌👌👌👌👌
HP.