Friday, 25 November 2016

सुख एक मृगजळ

🌷सुख हे खरोखरीच मृगजळ आहे का ?

सामान्य लोकांना सुख म्हणजे काय हे समजत तर नाहीच पण मोठमोठया विद्वान लोकांना सुध्दां सुख हे मृगजळ आहे असे वाटते .

याचे मुख्य कारण असे की , माणसे सुखाचा अमृतानुभव अनुभवण्याऐवजी ते सुखाच्या कल्पनेचा काल्पनिक भोग घेत असतात .

सुखाची कांही तरी कल्पना करुन घेऊन त्याच्या पाठीमागे लागल्याने सुख हाताला लागेलच कसे ? आणि अशा प्रसंगी सुख हे मृगजळ आहे असे म्हणण्यात काय अर्थ आहे बरे ?

लोक ज्या मार्गाने सुख शोधण्याचा प्रयत्न करतात त्याच्या नेमका उलटा मार्ग लोकांना ज्ञात नसल्यामुळे लोकांना सुखाचा शोध लागत नाही .

वास्तविक , ज्या जीवाला  सुखाचा ध्यास लागलेला असतो आणि जो त्या सुख प्राप्तीसाठी कशाचाही व कोणाचाही ध्यास व्हावयास तत्पर असतो , तो जीव स्वतःच पूर्णतः सुखस्वरुप असतो .

सुख मिळविण्यासाठी माणुस जितके अधिक प्रयत्न करतो तितका तो सुखापासून दूरदूर फेकला जातो .

याच्या उलट सुख मिळविण्याची धडपड करण्याचे माणसाने बंद केले व एका विशीष्ट सदगुरुप्रणित मार्गाने स्वतःच्या सुख स्वरुपाचे ज्ञान करुन घेतले की त्याला सुखाचा साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष अनुभव तात्काळ येऊ शकतो .

म्हणुनच तुकाराम महाराज सांगतात -

१) बैसोनि निवांत शुध्द करी चित्त ।तया सुख अंत नाही पार ।
येऊनी अंतरी राहील गोपाळ । सायासाचे फळ बैसलीया ।।

२) तुका म्हणे सुख देह निरसने । चिंतन चिंतने तद्रुपता ।।

 
       *卐 शुभ चिंतनमय क्षण 卐*
           
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

No comments:

Post a Comment